20 नोहेंबर1989 ला बाल हक्क संहितेला मान्यता मिळाली
प्रत्येक मुलाला न्याय हक्क मिळण्याची गरज आहे तरीही बाल समस्येवर आजही मोठ्या प्रमाणात काम केले पाहिजे.आपण सर्व यामध्ये सहभागी झाले पाहिजे मुलांना समता, ममता, तोहफा व लक्ष्य या चसुत्री मध्ये बघितले पाहिजे तरच समतोल साधला जाईल समतोलने गेली 18 वर्षे ही वैचारिक चळवळ सुरू ठेवली आहे आपणही यामध्ये सहभागी होऊन बालकांना सरंक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आजही समाजात बालकांचे कायदे नियम हक्क यावर जनजागृती म्हणावी तशी नाही म्हणून बाल लैंगिक शोषण, बालकामगार, अडचणीत असणारी बालके, जागोजागी दिसून येतात समाज डोळे मिटून बंद आहे त्यामुळे अत्याचार बालकांना सहन करावा लागत आहे आपला देश आत्मनिर्भर तर झालाच पाहिजे परंतु त्याआधी बालप्रेमी असला पाहिजे तरच पुढील भविष्य सक्षमपणे असेल त्यामुळे 20 नोहेंबरची तारीख विशेष लक्ष देऊन समाजात रूजवली पाहिजे.आपला समाज बालप्रेमी समाज.