संस्कार मूल्य सध्याची तरूणाई विसरत चालली— आप्पासाहेब खोत
विवेकांदन व्याख्यानमाल- पुष्प पहिले
शिराळा प्रतिनिधी
आई वडिलांना नमस्कार करणे .त्याच्या बद्दल आदर भाव जपण्याचे संस्कार मूल्य सध्याची तरुणाई विसरत चालली आहे.असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत यांनी केले.
श्री विवेकानंद सांस्कृतिक, क्रीडा व सेवा मंडळ शिराळा यांच्या वतीने आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत कथाकथन या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.या वेळी पत्रकार व मंडळाचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन,प्रा.प्रदीप पाटील (कवी) प्रमुख उपस्थित होते.या वेळी बोलताना कथाकार आप्पासाहेब खोत म्हणाले की,पवित्र मनाने केलेले कोणतेही काम ही परमेश्वराची सेवा असते.आज समाजात उद्धवस्तपणा आला आहे. बाप पोराचा खांदेकरू होऊ लागलाय हे त्याचेच चित्र आहे.पोरांच्या हातात पुस्तके व स्वप्न दया.ती चारित्रसंपन्न होतील.
ते पुढे म्हणाले साहीत्य व लिहीणाराला वय नाही पण वही आणि पेन आहे.साहित्यिकानी माणूस म्हणून चांगले असले पाहिजे.प्रा.खोत यांनी अस्सल भाषेत गॅदरिंगचा पाहुणा ही कथा ढंगदार शैलीत सांगीतली व उपस्थितांना खळखळ हसविले तर महापूर कथा सांगून रडविले .
प्रास्ताविक प्रा.प्रदीप पाटील(कवी) यांनी तर पाहुण्यांची ओळख श्रेयस महाजन यांनी करून दिली.या वेळी यादव व पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी बाबा परीट, प्रा.सुनील जोशी,हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमेश हसबनिस, दत्त पतसंस्थेच्या संचालिका सौ. सुखदा महाजन प्रा.आर.बी शिंदे,प्रा.डी. एन. मिरजकर, प्रताप पाटील ,महिला वर्ग प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होता.आभार बी.टी. निकम यांनी मानले.