महाराष्ट्र

‘या’ तारखेपासून सुरू होणार पहिली ते चौथी शाळा

Spread the love

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग तर शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिली ते बारावी पर्यंत सर्व वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

टास्कफोर्स सोबत वर्गासाठी लागू करावयाच्या नियमावली बाबत चर्चा केली जाईल. विद्यार्थी, पालक, शिक्षकां बरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण वातावरण देण्यासाठी काळजी घेतली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!