आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

अनधिकृत टोल नाक्यात मोठ्या धेंडांचे हितसंबंध ; नागरिकांची लूट – जनसेवा विकास समिती

जनसेवा विकास समितीने घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट

Spread the love

दिल्ली : राज्यमंत्री  बाळा भेगडे व गणेश भेगडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.या भेटी दरम्यान नितीन गडकरी यांनी लोकसभेत केलेल्या 60 किमीच्या आतील टोलनाका बंद करण्याच्या घोषणेचे स्वागत केले.त्याचबरोबर त्यांना अनधिकृत असलेला सोमाटणे टोल नाका हा केंद्र सरकार तर्फे तातडीने बंद करण्यात यावा या करीता लेखी निवेदन जनसेवा विकास समितीच्या वतीने देण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  सदरचे निवेदन काळजी पूर्वक वाचून त्यांचा निर्णय व केंद्राची भूमिका समितीला समजावून सांगितली.सदरचा टोलनाका हा राष्ट्रीय महामार्गावर असला तरी त्याचे पूर्ण अधिकार हे राज्य शासनाच्या ताब्यात दिलेले असून ह्या टोलनाक्या संदर्भात जे काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो फक्त राज्यशासनाकडे राखीव असल्याचं त्यांनी भेटीत नमूद केले.

आता मात्र चेंडू नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे राज्य शासनाच्या कोर्टात टोलवला आहे.राज्यशासनाच्या जीआर प्रमाणे राज्यशासनची मर्यादा हि 45 किमी ची असून त्या मर्यादेत सुद्धा सोमाटणे टोलनाका बसत नाही.सदरचा टोलनाका अनधिकृत आहे हे जनसेवा विकास समितीने वेळोवेळी पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे. तसेच हा टोलनाका अधिकृत आहे हे टोलनाका प्रशासनाने येत्या आठ दिवसात सिद्ध करावे.जर येत्या आठ दिवसात टोलनाका बंद करण्याबाबत पाठपुरावा झाला नाही तर जनसेवा विकास समिती तसेच तळेगावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील असा इशारा समितीने दिला आहे.

सदरचा विषय हा आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिक दृष्टया नागरिकांच्या आयुष्यावर मोठा दुष्परिणाम करत आहे. जनसेवा विकास समिती हा लुटमारीचा अन्याय सहन करणार नाही अशी मी सर्व पक्षीय नेत्यांच्या तसेच तळेगावकर नागरिकांच्या वतीने ग्वाही देतो.तळेगावात आमचे राजकीय दंद्व असेल किंवा राजकीय संघर्ष असेल, पण जेव्हा सामान्य नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक हिताचा प्रश्न ऐरणीवर येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक होऊन लढा देतो.आम्ही 105 होतो आणि लढतो हा इतिहास आहे हो आणि जुने जाणते असही सांगतात कि तळेगावाला पाच पांडवानीही हात जोडलेत. पाहुया आता विजय सत्याचा होतो का? असा निर्धार आवारे यांनी केला आहे.

या भेटीवेळी राज्यमंत्री  बाळा भेगडे , गणेश भेगडे, मिलिंद अच्युत, अनिल भांगरे, कल्पेश भगत, सुनील पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!