ताज्या घडामोडी
विनोद निर्मिती हा ज्ञान, अनुभव आणि चिंतानावर आधारित गंभीर उद्योग आहे-प्रा.डॉ.संजय थोरात
विनोद माणसाला तणावमुक्त करतो. करमणुकीतून आनंद मिळतो.विनोद वाचायला आणि सांगायला सोपा हवा. श्री अरविंद घोष यांनी माणसाला विनोद बुद्धी नसती तर जग पेटले असते असे म्हटले आहे. विनोद उत्साहाची लहर निर्माण करतो. माणसाला चेहऱ्यावर आठ्या घालायला७२ तर हसायला फक्त१४ स्नायूंची हालचाल करावी लागते. तुम्हाला हसवणाऱ्याकडे तुम्ही रागाने बघू शकत नाही. विनोद लोकशाहीवादी आहे. कुणीही सांगू शकतो. तणावमुक्त जगणं,निर्मितीची प्रेरणा, परस्पर संबंध सुधारणा,समस्या सोडवणूक ,संवादात वाढ या बाबी विनोद निमितीमुळे सहज शक्य होतात.हसा तुमच्याबरोबर जग हसेल हीच आपली जगण्याची मध्यवर्ती भूमिका होय.