आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

माळवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ४९ लक्ष निधी उपलब्ध..

माळवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन सोमवारी (दि.२९) जेष्ठ मान्यवर व महिलांच्या हस्ते संपन्न झाले.

Spread the love

माळवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ४९ लक्ष निधी उपलब्ध

आवाज न्यूज: राजेश बारणे, तळेगाव दाभाडे  ३० ऑगष्ट:-

माळवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन सोमवारी (दि.२९) जेष्ठ मान्यवर व महिलांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, माजी सरपंच सोपानराव दाभाडे, बबनराव भोंगाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, बबन आल्हाट, नामदेव दाभाडे, चंद्रकांत दाभाडे, जालिंदर गाडे, नवनाथ पडवळ, सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच मनिषा दाभाडे, सदस्य पूनम आल्हाट, पूजा दाभाडे, पल्लवी मराठे, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले की, “विधानसभेच्या निवडणुकीवेळी विकासाची आश्वासने देऊन मते मागितली आणि मावळच्या जनतेने देखील मोठ्या विश्वासाने मतदानरुपी आशीर्वाद दिला. त्या विश्वासास पात्र ठरुन ती आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा नेहमीच असतो. तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या माळवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे.भविष्यातील गरजा ओळखून अंतर्गत रस्ते व स्वतंत्र पाणी योजनेसह गावाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचा आहे.या योजनेसाठी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुमारे ४ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे व इतर विकासकामांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला आहे.आगामी काळात देखील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.”

माळवाडी गावात वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येत नसल्याने माळवाडी गावासाठी फिल्टर प्लांट व नवीन नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीने आमदार सुनिल शेळके यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून माळवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे ४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नवीन नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असल्याने पुढील काळात येथील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होईल व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय टळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!