ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

पुण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या विविध विभागात/संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या 213 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली...

Spread the love

पुण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २२ नोव्हेंबर.

  केंद्रीय मंत्री रामदास आठवले  यांच्या  हस्ते, केंद्र सरकारच्या विविध विभागात,संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या 213 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितलं की, आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.

“देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रोजगार मेळावा सुरु केला आहे. या आधी, ऑक्टोबरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात, 75,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.” नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला आठवले यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!