विद्या मंदिर वाटंगी येथील 1994- 1995 सलातील इयत्ता ७ वी मधील वर्ग मित्र – मैत्रिणींचा स्नेह मेळावा पार
या स्नेह मेळावा च्य्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध जपले. कार्यक्रमाची सूरवात शाळेतील प्रार्थनेने झाली.त्यानंतर दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक जे आता हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली.
या स्नेह मेळावा मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले.
सोशल मीडिया च्यया माध्यमातून तत्कालीन विद्यार्थ्यांना संघटित करून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सकाळपासून संधयाकाळपर्यंत वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम संपन्न झाला.यामध्ये ओळख परेड, इनडोअर खेळ, स्नेहभोजन,मनोगत ,ग्रुप ची पुढील वाटचाल आणि एका विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश देसाई व अर्चना कांबळे यांनी केले.जयवंत दळवी यांनी स्नेह मेळावा करण्या मागचं कारण आणि पुढील वाटचाली विषयी मत मांडले, त्याला सर्वांनी सहमती दर्शवली.
किशोर गिलबिले यांनी आभार प्रदर्शन मानले.
तब्बल २७ वर्षांनी भेटलेले हे सर्व विद्यार्थी कार्यक्रमाच्या शेवटी भावूक झाले होते.