वाड्या-वस्त्यांवरील विकासासाठी नेहमी कटीबध्द : विराजदादा नाईक
कोकरुड/वार्ताहर
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील असणाऱ्या सोनवडे, खोतवाडी, काळोखेवाडी, भाष्टेवस्ती, जळकेवाडी, सावंतवाडी या वाड्या वस्त्यांवरील विकासासाठी आम्ही नेहमी कटीबध्द राहू असे प्रतिपादन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज दाद नाईक यांनी केले.ते खोत वाडी ता शिराळा येथे आ.मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून सोनवडे, खोतवाडी, काळोखेवाडी, भाष्टेवस्ती, जळकेवाडी, सावंतवाडी येथे
मंजुर झालेल्या १ कोटी ९८ लाख ५० हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन व शुभारंभ करण्यात आला . त्यामध्ये सोनवडे, खोतवाडी, सावंतवाडी, काळोखेवाडी, भाष्टेवस्ती, जळकेवाडीसाठीच्या १ कोटी ३९ लाख रुपये किंमतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना, जळकेवाडी येथे १२ लाख ५० हजार रुपयांची अंगणवाडी इमारत, खोतवाडी येथे १२ लाख रुपयांची जोतिर्लिंग मंदिराजवळ संरक्षक भिंत, सावंतवाडी येथे १० लाख रुपये खर्चाची मारुती मंदिराजवळ संरक्षक भिंत, काळोखेवाडी येथे १० लाख रुपये खर्चाची गणेश मंदिराजवळ संरक्षक भिंत व सुशोभिकरण व १२ लाख रुपये खर्चाचा विहिर रस्ता काँक्रेटीकरण, सोनवडे येथे ५ लाख रुपये खर्चाचा मेनरोड ते गणेशमंदीर रस्ता काँक्रेटीकरण करणे या कामाचा समावेश होता. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, विश्वास चे संचालक शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी समाजसेवक शंकरदादा मोहिते यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.या कार्यक्रमास युवानेते भुषण नाईक , यांच्यासह सोनवडे, खोतवाडी, काळोखेवाडी, भाष्टेवस्ती, जळकेवाडी, सावंतवाडी येथील स्थानिक पदाधिकारी, विविध मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.