मराठी साहित्य मंडळाच्या वर्धापनदिन निमित्ताने निसर्गरम्य केळवा येथे कविसंमेलन संपन्न
प्रतिनिधी-लक्ष्मण राजे
सफाळे:- पालघर तालुका साहित्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मंडळाचे पदाधिकारी, व सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघ केळवा ता,जि पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी कालिकादेवी मंदिर केळवा येथे आनंदात व उत्साहात कविसंमेलन संपन्न झाले.या कविसंमेलनात आरंभी स्वेजल म्हात्रे यांच्या सुमधूर गोड आवाजात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तसेच स्वर्गीय भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने श्री विकास पाटील यांनी स्वता: निर्मिती केलेल्या कै. भीमसेन जोशी यांच्या माहिती पटाची चित्रफित दाखवून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जमील शेख यांनी प्रास्ताविक सादर करताना सांगितले, या ठिकाणी श्रोत्यांची गर्दी नसली तरी सारे( कवि, साहित्यिक ) दर्दी जमलेले आहेत. सुधाकर ठाकुर कोकण मराठी साहित्य परिषद पालघर शाखेचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, आपल्या आत्मनिर्भर कवितेवर आपले प्रेम असेल तरी, कविता प्रसिद्धी पूर्वी कवीने ती कविता पुन्हा पुन्हा वाचुन तिचे परिक्षण करावे. तर ती एक दर्जेदार व संस्मरणीय कविता जन्माला येते. व ती वाचकांना दिर्घकाळ आनंद देते. अश्या प्रकारच्या कविता निर्मितीसाठी, आपल्याजवळ विपूल व सखोल वाचनांची पुंजी ( शब्द ज्ञान ) असायला हवे. विनोद म्हात्रे कालिकादेवी मंदिर केळवा अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले, काव्यप्रेमी, साहित्यिक, जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीने हा परिसर चैतन्यमय, भक्तीमय होतो, तरी साहित्यिक मंडळीने असे कार्यक्रम येथे पुन्हा पुन्हा करावेत. कविसंमेलनात प्रा. स्मिता पाटील, स्वेजल म्हात्रे, दिनेश पाटील, सुधाकर ठाकुर, जयप्रकाश पाठक, महिंद्र पाटील, दिनेश पाटील, दामोदर वर्तक, यांनी आपल्या कविता सादरकेल्या. संध्या सोंडे व सुरेश पंडीत यांच्या कविता ऐकवण्यात आल्या. तसेच रमाकांत पाटील यांनी आपल्या स्वतःच्या चारोळ्या सादर केल्या. कार्यक्रमाला अनेक मान्यवर कवि,साहित्यिक आदि व श्री विनय पाटील संमेलन उपाध्यक्ष, हेमंत राऊत कोषाध्यक्ष, हरिचंद्र पाटील, हरिहर पाटील, काशिनाथ वर्तक, कृष्णा पाटील, प्रदीप राऊत, सुधाकर पाटील, जयप्रकाश तांडेल, अरूण सावे, मोतीराम तांडेल, चिंतामण तांडेल, मंगेश तेली, मंदाकिनी वर्तक, विनोद वर्तक, नरेंद्र वर्तक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र पाटील यांनी कुशलतेने केले. तर आभार प्रदर्शन क दिनेश पाटील यांनी केले. अशी माहिती श्री जमील शेख यांच्या कडून माहिती मिळत आहे.