गुरू पौर्णिमा ! गुरुपूजन भारतमातेच्या पूजनाने केले .’ग्रामीण स्त्री शक्ती’ ने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा.
प्रतिनिधी ~सौ.मंजुषा पवार.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी
“शेती सहायक महिला मेळाव्या”चे आयोजन करण्यात आले. प्रथम सैनिक कुटुंब सन्मानदिनानिमित्त सीमेवरती कार्यरत असणारे सैनिक श्री दादासो कदम यांच्या पत्नी व वडील श्री सर्जेराव कदम यांचा सन्मान केला.
सेन्ट्रल वेलफेअर बोर्ड च्या मान्यतेनुसार “भारतीय स्त्री शक्ति” च्या मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र ,सांगोला यांच्या सहकार्याने ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेने गोमेवाडी येथे “मैत्रीण कुटूंब सल्ला केंद्र” च्या शाखेचे उद्घाटन केले. त्यासाठी सांगोला येथील मैत्रीण कुटूंब सल्ला केंद्राच्या संचालक श्रीमती वसुंधराताई , समुपदेशक श्रीमती अंजली पोवार, सदस्य श्रीमती क्षमाराज नष्टे या उपस्थिती होत्या. यांनी मेळाव्यात “नांदा सौख्य भरे “या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले .
श्रीमती वसुंधराताई यांनी ‘ मैत्रीण’चे काम कोणकोणत्या कौटुंबिक समस्यांवर, स्त्रियांविषयीच्या आंतरिक जिव्हाळ्याने’ कोणतीही प्रसिद्धी न देता कसे चालते , हे महिलांना समजावून सांगितले .श्रीमती अंजलीताई यांनी कोणकोणत्या शासकीय योजनांचा लाभ स्त्रियांना घेता येतो , याची माहिती दिली .श्रीमती क्षमाराज नष्टे यांनी संसारात समन्वय साधून संसार आनंदमय कसा करता येतो याबद्दलचा मंत्र दिला .
यावेळी तीन महिला तक्रारी घेऊन वसुंधराताई आणि अंजलीताईना भेटल्या .त्यांना काही गोष्टी समजावून देऊन सांगोला केंद्रात येण्याचे त्यांनी सुचविले आहे .
मेळाव्याचे प्रास्ताविक सुनेत्रा कुलकर्णी ,पाहुण्यां मैत्रिणींचा परिचय नीला देशपांडे यांनी करून दिला.प्रार्थना स्मिता ,गायत्री ,अर्चना,कल्याणी यांनी सांगितली ,आभारप्रदर्शन सविता जवळे यांनी आणि सूत्रसंचालन मनिषा देशपांडे यांनी केले .या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे देणगी दाते श्री व्ही व्ही देशपांडे सर सपत्नीक व सौ. मंदाताई घाडगे, श्री अंबादास देशपांडे हे ही देणगीदार उपस्थित होते.
महिलांनी स्वतःला दुय्यम समजू नये , म्हणून त्यांना त्यांच्या कष्टांच्या सफलतेची ,कर्तृत्वाची जाणीव करून देणे हा या मेळाव्याचा नेहमीच उद्देश असतो.