आरोग्य व शिक्षण
भाज्यांचे दर वाढले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
मुंबई : ऐन सणासुदीच्या तोंडावर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाज्यांची आवक घटल्याने व अवकाळी पावसामुळे दरांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
वाशीच्या एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ विक्रीत दुपटी ते तिपटीने वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरांवर परिणाम झाल्याचे विक्रेते सांगतात.
प्रत्येक भाज्यांमागे 30 ते 40 रुपये प्रति किलो भाव वाढला आहे. इंधन दरवाढ पाठोपाठ भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.