संविधानामुळे देशाची एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे : सरपंच किशोर गित्ते
परळी ( प्रतिनिधी) संविधानामुळे देशाची एकात्मता आणि अखंडता कायम आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तथा बेलंब्याचे सरपंच किशोर दिनकरराव गित्ते यांनी केली. परळी तालुक्यातील मौजे बेलंबा येथे दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष तथा बेलंब्याचे सरपंच किशोर दिनकरराव गिते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे, वैजनाथ बँकेचे संचालक वाघमारे भाजपाचे नेते राजेश गित्ते ,रमाकांत गित्ते संभाजी ब्रिगेडचे देवराव महाराज लुगडे प्रसन्नजीत रोडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भिम जंयती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमास गावातील महिला पुरूष मोठ्या संख्येनं उपस्थित होते