प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने—- मागे वळून पाहताना
आज देशामध्ये सत्ताधारी पक्ष व विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर विचारमंथन करून कृती करणे काळाची गरज झाली आहे
.वारेमाप वाढणारी लोकसंख्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात शंभर कोटीची भर पडल्यामुळे सुविधा नैसर्गिक संपत्ती विविध योजनायावर भयंकर ताण येत असून देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा अडसर आज वारेमाप वाढणारी लोकसंख्या आहे .देशाचे संरक्षण देशाच्या संरक्षणाबाबत गांभीर्याने विचार केला असता चीनचे फार मोठे संकट देशासमोर हळूहळू वाढत आहे सर्वसीमा चीन मुळे धोक्यात येत आहे .बेरोजगारीदेशामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना नोकरी मिळणे भयंकर जिकरीचे झाले आहे जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणे काळाची गरज आहे .सामाजिक समरसता तथासमान नागरी कायदा देशामध्ये सर्व समाज एकसंघ असणे आवश्यक आहे त्यासाठी समान संधी आवश्यक आहेत जात धर्म पंथ लिंग याची भेदभाव बाजूला सारणे यासाठी समान नागरी कायदा करावा लागणार आहे .भ्रष्टाचार निर्मूलन व कार्यक्षम जनहितार्थ प्रशासन देशामध्ये भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे अनेक क्षेत्रामध्ये त्याची व्यापकता वाढत आहेसरकारी अधिकारी तथा प्रशासन कार्यक्षमता व जनहितार्थ योजना राबवणारे असली पाहिजे
शेतकऱ्याची आत्महत्या व शेतमालाचे रास्त दर
कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतीच्या मालाला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शिफारशी प्रमाणे रास्त दर देण्याची वेळ आली आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यामुळे त्याचा उद्रेक युवक वर्गातून झाल्यास फार मोठा स्पोर्ट होऊ शकतो ७शैक्षणिक दर्जा
कोरोनाच्या .महान संकटामुळे शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे त गुणवत्ता टिकवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत ******
८आरोग्यसुविधा वर सरकारची यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे तथापि लावणे अंतर सामाजिक ठेवणे सगर्दी टाळणे यासारख्या गोष्टीवर सुद्धा समाजाचे दुर्दैवाने सहकार्य मिळत नाही त्यासाठी समाज शिक्षण व जागृती आवश्यक आहे. सामाजिक जडणघडण सुधारण्यासाठी सामाजिक सार्वजनिक कार्य करणारे समाज सुधारक निर्माण होणे आवश्यक आहे बालकांचे कुपोषण व महिलांच्या आरोग्य यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार समाधानकारक काम करत आहे तथापि आजही अनेक बालकांची कुपोषण होत आहे महिलांच्या आहार व ग्रामीण भागातील जीवन शैली आरोग्य सुधारण्यासाठीत्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी ज्ञान विस्तार कार्य प्रचार व प्रसार आवश्यक आहे