महाराष्ट्र

बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी ; या आहेत अटी

Spread the love

मुंबई : बैलगाडा शर्यतीला असणारी बंदी उठवत सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यभर बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार आहे.


शर्यतीला परवानगी देतानाच न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.

शर्यतीसाठीच्या अटी :-

1)धावण्याच अंतर हजार मीटरपेक्षा अधिक लांबीच नसावं

2)शर्यतीची धावपट्टी उतार, दगड, किंवा खडक, चिखल, दलदल असलेली ठिकाण नसावे

3)रस्त्यावर,महामार्गावर शर्यत आयोजित करू नये

4) कोणत्याही शर्यतीसाठी बैलांना, वळूंना किमान 30 मिनिटे आराम द्यावा

5)एका दिवसात तीन पेक्षा अधिक वेळा शर्यतीसाठी बैल वळूचा वापर करू नये

6)धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान वीस मिनिटे आराम द्यावा

7)बैलगाड्या भोवती तसेच धावपट्टीवरती कोणतेही वाहन चालवता येणार नाही

8)चाबूक, काठीसारखे साधन बाळगता येणार नाही

9)कोणत्याही प्रकारे बैलाला दुखापत करता येणार नाही

10)बैल व वळूच्या जोड्या सुसंगत असाव्यात

11)शर्यतीच्या ठिकाणी पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध असावी

12)शर्यती अगोदर बैलांना कोणतेही उत्तेजक द्रव्ये देऊन नये

13)बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!