मैत्री प्रतिष्ठान, मुंबई आयोजित समुद्र किनारा स्वच्छता अभियान संपन्न.
विरार : स्वच्छता म्हटले की आपल्या सर्वांना आठवते ते आपले स्वताचे घर, स्वताच्या वस्तू परंतु आपल्या आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे यांच्याशी आपला काहीच संबंध नाही का? प्रत्येकजण आपले घर स्वच्छ करतो , परंतु आपली सर्व घाण, कचरा रस्त्यावर आणि चौकांवर फेकून देतो हाच कचरा नाल्यातून समुद्रात जाऊन मिळतो हे किती लज्जास्पद आहे.
म्हणूनच मैत्री प्रतिष्ठान या संस्थेने स्वच्छ भारत या संकल्पनेतून विरार येथील अर्नाळा समुद्र किनारा स्वच्छता अभियान हा उपक्रम हाती घेतला. याच समुद्र किनार्यावर रोज हजारो पर्यटक भेट देतात परंतु यामधे स्वच्छतेची सामाजिक जाणीव असणारे काही मोजकेच असतात. हीच निसर्ग संपत्ती जोपासण्याचा मैत्री प्रतिष्ठान कडून केलेला हा छोटासा प्रयत्न.
संस्थेच्या स्वयंसेवकांनी अत्यंत कमी वेळेत अतिशय सुंदर नियोजन केले स्वच्छतेची उपकरणे, वैयक्तिक सुरक्षेच्या वस्तू यांची जमवाजमव अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. त्यातच अर्नाळा पोलिस अधिकारी व अर्नाळा ग्रामपंचायत यांचीही या उपक्रमास चांगली साथ लाभली. अर्नाळा ग्रामपंचायत कडून उपक्रमासाठी काही वस्तू व ट्रॅक्टर चि सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.अर्नाळा पोलिस अधिकारी, अर्नाळा ग्रामपंचायत व आलेल्या पर्यटकांनी ही संस्थेचे काम पाहून संस्थेचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिनू रिकामे, विपुल पोरे, प्रभाकर तांबे , अनिकेत साटम, राहुल कानसे, नितीन शिंदे, कृनाल चव्हाण जितेंद्र कळमकर , विशाल रिकामे , विक्रांत पडियार, सुधीर रिकामे, सागर कांबळे, सुभाष टेमकर ,सचिन तांबे ,अनिल भांबळे सर, सोबत सर्व स्वयंसेवक इत्यादींनी आपले उपक्रमास वैयक्तिक हातभार लावून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.