नेर्ले (ता. वाळवा) येथील श्री चैतन्य सार्वजनिक वाचनालय व जयभीम मोफत वाचनालय यांना सादाभाऊ खोत यांच्या फंडातून पन्नास हजार (५०,०००) रुपयांची पुस्तके देणगी.
सविस्तर महिती अशी कि सदरची संस्काराची केंद्रे असून वाचन चळवळ अधिक बळकट वाचनाल उभारण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांनी आपल्या फंडातून ५० हजार रुपयांची पुस्तके देणगी म्हणून दिली , आपल्याफंडातूनआहे असे प्रतिपादन रयत क्रांती पक्षाचे राज्याचे प्रवक्ते लालासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी श्री चैतन्य सार्वजनिक वाचनालय व जय भीम मोफत वाचनालय यांना पुस्तके प्रदान करणे प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान या प्रसंगी युवा नेते सागर खोत, पश्चिम महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बजरंग भोसले, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष लालासाहेब धुमाळ ,हे उपस्थित होते.
कार्यवाह अवधूत कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मनोहर पाटील यांनी आभार मानले. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, अध्यक्ष रवींद्र जामदार, मनोहर पाटील ,विशाल पाटील ,सुरेश जामदार, यादव जाधव ,अमर शिंदे ,संदेश कुलकर्णी ,अभिजीत कुलकर्णी, दिनकर पाटील ,गणेश पाटील ,अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.