महिलांना शेतीचे अद्यावत ज्ञान व माहिती देत प्रोत्साहन दिल्यास,त्या अधिक काटकसर आणि जिद्दीने शेती करतील -विजयराव पाटील
इस्लामपूर दि. ६ (प्रतिनिधी)
आपल्या कृषिप्रधान देशात शेती क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. महिलांना शेतीचे अद्यावत ज्ञान व माहिती देत प्रोत्साहन दिल्यास,त्या अधिक काटकसर आणि जिद्दीने शेती करतील,असा विश्वास राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केला. आपल्या साखर कारखान्याने आपले मार्गदर्शक आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने शेतकऱ्यांना अद्यावत प्रशिक्षण व माहिती उपलब्ध करून दिल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक महिलांना व्हीएसआय,पुणे (मांजरी बु:) या संस्थेतील अद्यावत ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबिरास पाठविण्यात आले. याप्रसंगी या महिलांना निरोप देताना ते बोलत होते. कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील उपस्थित होते.
विजयराव पाटील म्हणाले,व्हीएसआय ही साखर उद्योगातील शिखर संस्था आहे. आपणास या प्रशिक्षण कालावधीमध्ये जे-जे अद्यावत ज्ञान,माहिती दिली जाईल,ते व्यवस्थित आत्मसात करावे. तसेच आपण ऊस शेती करताना त्याचा उपयोग करावा. आपण भविष्यात कमी खर्चात जादा उत्पादन घेण्यास या शिबिराचा निश्चितच फायदा होईल.
यावेळी ऊस उत्पादक महिला शेतकऱ्यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने इतक्या प्रगत शेती शिबिरास उपलब्ध रहाण्याची संधी दिल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक आ.जयंतराव पाटील, अध्यक्ष पी.आर. पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील व संचालक मंडळाचे ऋण व्यक्त केले.
सौ.वैशाली ज्ञानदेव पाटील कामेरी, सौ.मनिषा राजाराम मोटे तांदुळवाडी, सौ.वासंती विजय जाधव आष्टा,सौ.वर्षा महेश पाटील कृष्णानगर,सौ. शुभांगी अमोल देशमुख वशी,श्रीमती वासंती सिताराम खोत डोंगरवाडी या ऊस उत्पादक महिलांना व्ही एसआयच्या अद्यावत प्रशिक्षणास पाठविण्यात आले आहे.राजारामनगर येथे पुणे (मांजरी बु:) येथील व्हीएसआय या संस्थेतील ज्ञान लक्ष्मी या महिलांच्या प्रशिक्षणास रवाना होणाऱ्या महिलांना निरोप देताना विजयराव पाटील,आर.डी.माहुली,प्रशांत पाटील,सुजय पाटील.