शेतकऱ्यांनी मातीतील सेंद्रीय घटकांचे प्रमाण वाढवावे: डॉ.ए.एन.साळुंखे
कोकरुड/वार्ताहर
निसर्ग हा ९६% पिकाचे संगोपन करतो व माणूस हा ४% पिकांचे संगोपन करतो.या करिता शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून व निसर्गाला समजून मातीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढून शेती करणे काळाची गरज बनली आहे.असे प्रतिपादन ऊस शास्त्रज्ञ डॉ.ए. एन. साळुंखे यांनी केले.चरण (ता.शिराळा) येथे डालमिया भारत शुगर व सॉलीडरीडॅड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे चे युनिट हेड संतोष कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. साळुंखे म्हणाले, रासायणिक खताचे वाढते दर व त्यांच्या अति वापरामुळे मातीवर होणारे दुषपरिमाण पहाता सेंद्रीय व जैविक घटकांचा वापर वाढवून जमिनीचा पोत सुधारला तरच ऊस उत्पादन वाढणार आहे.
निनाईदेवीचे युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे शेती करण्याचे कष्ट मोठे आहे.त्या तुलनेत उत्पन्न कमी आहे .या करिता आपले शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस विकास अधिकारी यांचे मार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. असे आवाहन केले.या वेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, शेतिअधिकारी मनोहर मिसाळ,तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कांबळे, स्वागत सतीश यादव यां प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी युवराज चव्हाण यांनी केले.तर आभार सॉलीडरीडॅड चे फिल्ड प्रोग्राम ऑफिसर विलास मालाधारी यांनी मानले. या कार्यक्रमास शेतकरी, महीला, कारखाना प्रसासनातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.