स्त्रीने कायद्याचा गैरवापर करू नये” – ॲड .सौ नेहा सूर्यवंशी
“संस्कार सोबत असतील तर कायद्याची गरज भासतच नाही.तिची स्वतःची सुरक्षा ही स्वतःच्या हातामध्ये आहे.आपण समाजामध्ये व्यवस्थित राहिलो तर आपण सुरक्षित असतो”. असे प्रतिपादन एडवोकेट सौ.नेहा सूर्यवंशी दिवाणी फौजदारी न्यायालय शिराळा यांनी केले.
येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या,पदवी व पदव्युत्तर विभाग ,महिला तक्रार निवारण समितीने ,महाविद्यालय अंतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या . महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.अंकुश बेलवटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सौ.सूर्यवंशी म्हणाल्या, “मुलीने स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहिल्यानंतर लग्नाचा विचार करावा आपल्याला सक्षम व्हायचे असेल तर आदर्श स्त्रियांची आत्मचरित्रे वाचले पाहिजेत कायदा स्त्रीसाठी आहे पण त्याचा वापर गैर वापरासाठी होता कामा नये स्त्रीला सुरक्षा कवच असावा म्हणून कायदा आहे त्याचा वापर गैर होता कामा नये स्त्रियांनी आभूषणे वापरावीत या पाठीमागचे सायन्स समजून वापर करावा त्याचा फॅशन म्हणून वापर करू नये .मोबाईल, टीव्ही क्षणिक सुख देणारे साधन आहे .त्याच्यासाठी जास्त वेळ न देता संध्याकाळी ७ ते १०कुटुंबासाठी वेळ द्या. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुधारेल त्यांनी विद्यार्थिनी कडून शपथ घेतली की मी कायद्याचा गैरवापर करणार नाही”.
प्राचार्य अंकुश बेलवटकर म्हणाले की,”आपण क्षणिक मोहाच्या पाठी मागे लागतो व आपले आयुष्य बरबाद करून घेतो. आणि कायद्याचा वापर करतो हे चुकीचे आहे .आपले पाऊल आपण सावरले पाहिजे .भारतीय संस्कृतीचे जतन करुन नैतिकतेची चौकट सांभाळून आपण समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण करावी”. असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.शीला रत्नाकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.शेखर खोत यांनी केले व डॉ.स्नेहल हेगिष्टे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन डॉ.वर्षा पाटील, प्रा. डॉ. मेघा पाटील, प्रा. डॉ.संजिवनी पाटील, प्रा. डॉ. वृषाली पाटील प्रा. डॉ. राम घुले व प्रा.सुर्यगंध उपस्थित होते.