ताज्या घडामोडी

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाचे नेतृत्त्व हरजित मलकितसिंग संधू हिच्याकडे

Spread the love

हरजित संधू कर्णधार

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई : येत्या ५ ७ जून दरम्यान हरयाणा-पंचकुला येथे होणाऱ्या चौथ्या १८ वर्षाखालील खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाचे नेतृत्त्व हरजित मलकितसिंग संधू हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. परळच्या एम. डी. कॉलेजात १२वीत शिकत असलेल्या संधूची निवड मुंबई विभागातर्फे झाली आहे. मुंबई विभागाने निवड स्पर्धेत जेतेपद पटकावले. स्पर्धेसाठी पुण्यात बालेवाडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली सलग २ वर्षे राष्ट्रीय कुमारी स्पर्धेसाठी संधूची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. चुनाभट्टी येथील आराध्य सेवा संघातर्फे हरजित स्थानिक स्पर्धात खेळते. मुंबई उपनगरच्या यशिका पुजारी आणि पालघरच्या हर्षदा पाटीलची देखील खेलो इंडियासाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. त्या विजेत्या मुंबई विभाग संघात होत्या. गीता साखरे संघाच्या प्रशिक्षिका आहेत. (फोटो : कर्णधार हरजित संधू)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!