आरोग्य व शिक्षण

निगडी ते पवनानगर बससेवा सुरू करण्यात यावी, बजरंग दलाची मागणी

स्वारगेट आगारातील चीफ ट्रान्सपोर्ट ऑफिसर राजेश रुपनवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Spread the love

निगडी ते पवनानगर बससेवा सुरू करण्यात यावी, बजरंग दलाची मागणी
मावळ : निगडी ते पवनानगर बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने पीएमपीएमएल स्वारगेट आगारातील चीफ ट्रान्सपोर्ट ऑफिसर राजेश रुपनवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

बजरंग दलाने निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात पीएमपीएल बस सेवा सुरू आहे. त्यास नागरिकांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरात पवन – मावळातील तरुण, शेतकरी, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक व कामगार नोकरी शिक्षणानिमित्त नियमित येजा करत असतात. बससेवा सुरू नसल्यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. परिणामी अनेकजण वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्याबरोबर कामगार वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

पवन मावळातील पवनानगर हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चार गड किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना तसेच पवना धरण ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. पवनानगर पर्यंत बससेवा सुरू झाल्यास स्थानिक लोकांना दिलासा मिळेल. प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय टळेल व स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे मत बजरंग दल संयोजक विश्वास दळवी यांनी व्यक्त केले.

यावेळी संदेश भेगडे, बाळासाहेब खांडभोर, प्रशांत ठाकर, प्रदीप मालुसरे, विशाल ढोले, सागर घायाळ, सनी तुपे, चेतन ठाकर आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!