दलितांचे कैवारी छत्रपती शाहू महाराज : राजेश नाईक
(वर्षाराणी दुर्गे सरुडकर) लक्ष्मी पायांत लोळण घेत असता हिंदुस्थानातील इतर संस्थानिकांप्रमाणे राजैश्वराचा उपभोग घेत खुशालीचे जीवन न कंठता कोल्हापुरचा शाहु राजा. दिनदलितांच्या वस्तीत, रयतेच्या झोपडीत गेला आणि त्याने त्यांच्या उद्धाराचा वसा घेतला, असे प्रतिपादन नाईक मसालेचे मालक राजेश नाईक यांना केले. शाहू महाराज म्हणजे क्रांती आणि आधुनिक विचारांची गंगोत्री. महाराष्ट्राला आधुनिक विचारांचा वारसा त्यांनी दिला. स्वतंत्र विचार आणि सामाजिक जाणीव असलेले अनेक विचारवंत शाहू महाराजांच्या कार्यामुळे घडले. महाराजांची प्रत्येक कृती ही समाजाच्या सर्वांगीण विकासाठी होती. आदर्श राज्य व्यवस्था कशी असावी, याचा वस्तुपाठ छत्रपती शाहू महाराजांनी दाखवून दिला. आरक्षणाचे जनक, बहुजनांचे कैवारी, सामान्य जनतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. राजदंड हि शोभेची वस्तु नसुन लोकसेवेचे एक साधन आहे. याची पुर्णपणे जाणीव असलेला हा एक अलौकीक राजा होता, लोकांवर प्रेम करणारा, प्रजेवर माया करणारा, प्रचंड देहाचा आणि मोठ्या मनाचा, गरिबांवर प्रेम करणारा, जातपात न मानणारा, उद्योगांना चालना देणारा, कुस्तीची आवड असणारा, कलेला आश्रय देणारा, शिक्षणाचा पुरस्कार करणारा. शाळेच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता. अशा या लोकनायकास आभाळाएवढ्या छत्रपतींना स्मृतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन.