ताज्या घडामोडी

महाराष्ट्राच्या आर्थिक समृद्धीमध्ये एस. टी. चा मोठा हातभार.- माजी मंत्री शिवाजीराव नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा आगाराच्या वतीने एस. टी. च्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, महाराष्ट्राची लोक वाहिनी म्हणून एस. टी. कडे पाहिले जाते. एस. टी. ने गेल्या ७५ वर्षात अनेक चढ उतार पाहिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येकाला एस. टी. ने खूप काही दिले आहे. अनेक सेवा पुरविल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक समृध्दी मध्ये खूप चांगला हातभार लागला आहे. एस. टी. च्या व्यवस्थापनाने प्रवाश्यांना आधुनिकता असणाऱ्या सेवा द्याव्यात.
प्रारंभी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सत्यजित देशमुख, सुखदेव पाटील, के. डी. पाटील, विद्याताई कदम यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक संभाजीराव नलवडे यांनी केले. यावेळी के. वाय. भाष्टे, प्रकाश पाटील, शरद शेळके, अनिकेत लाड, किरण पाटील, सतीश सुतार, रोहित पाटील, महेश सुतार यांच्यासह एस. टी. आगारातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!