स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पावस :—रत्नागिरी तालुक्यातील ग्राम सुधारक सेवा समिती ( पावस ) मुंबई संचलित स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर आणि डॉ.बी.आर तथा दादासाहेब सामंत ज्युनियर कॉलेजमध्ये पहिले संचालक स्वर्गीय तात्यासाहेब सामंत यांचा ५४ वा स्मृतिदिन तथा विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री. सुमन सामंत यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लागला . शिक्षकांची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य यामुळेच दहावी आणि बारावी कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचा निकाल प्रत्येक वर्षी १०० टक्के लागत आहे. प्रशाला व कॉलेजने आपल्या गुणवत्तेचा आलेख परंपरेनुसार उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता दहावी मधून प्रथम क्रमांक कु.अपूर्व सामंत , द्वितीय क्रमांक कु.रिनत सुतार , तृतीय क्रमांक कु.सानिया म्हादये , आणि बारावी कला शाखेमधून प्रथम क्रमांक कु.साक्षी बनकर , द्वित्तीय क्रमांक कु. समता खरडे, तृतीय क्रमांक कु.सायली बेंद्रे, त्यानंतर वाणिज्य शाखे मधून प्रथम क्रमांक कु.साईराज पानगले,व कु.मधुरा मयेकर, द्वितीय क्रमांक कु. केतन कुळये, तृतीय क्रमांक कु.अथर्व गुरव आणि विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु.रोहिणी माटल, विभागून कु. वेदिका गुरव कु.पूजा पवार तृतीय क्रमांक कु. साहिल तरळ अशा प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचा संस्थेकडून रोख रक्कम श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला . दहावी व बारावीच्या निकालात विविध विषयांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणार्या
विद्यार्थ्यांचाही पालकांसह गुणगौरव करण्यात आला . गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकल कमिटी सचिव हरीश सामंत , स्मिता पाटील , बाबाजी कुरतडकर यांनी केले . या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे , सहकार्यवाह सुरेश गुरव , राजेश सामंत , लोकल कमिटी अध्यक्ष माधव पालकर , शालेय समिती अध्यक्ष संतोष सामंत , मुख्याध्यापिक प्रिया गावडे आदी उपस्थित होते.प्रशालेच्या बारावीच्या तिन्ही शाखांचे आणि दहावीचा शंभर टक्के निकाल , लागल्याबद्दल समस्त पंचक्रोशीतील पालक , विद्यार्थी आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक श्री बी. बी. माने यांनी आभार मानले.