ताज्या घडामोडी

पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक श्री शरद गोरे यांच्या हस्ते होणार

Spread the love

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा विभाग आयोजित पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी डोंबिवलीच्या सांस्कृतिक भूमीवर आयोजित करण्यात आले आहे. या भव्य दिव्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, इतिहास संशोधक, संगीतकार, सिने दिग्दर्शक, शिव व्याख्याते असे बहु आयमी व्यक्तिमत्त्व असणारे श्री शरद मधुकर गोरे (संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.म.सा.प. ) यांच्या शुभ हस्ते होणार आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका, नाट्य दिग्दर्शिका, सुप्रसिद्ध वास्तूतज्ञ, हिरकणी राजश्री बोहरा ( अध्यक्षा मुंबई प्रदेश) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन संस्थेच्या ठाणे जिल्हा विभागाच्या वतीने करण्यात आलेले असून स्वागताध्यक्ष पदी सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. अनिता गुजर (अध्यक्षा ठाणे जिल्हा) या असणार आहेत.

डोंबिवलीचे ती. डी. सी. बँकेचे चेअरमन, स्थानिक नगरसेवक, उद्योगपती, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व श्री बाबाजी पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक, सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ व मार्गदर्शक श्री क्रंतिकुमार महाजन, साप्ताहिक परळी समाचार, दैनिक जनरेखा वृत्तपत्राचे संपादक, ज्योतिर्लिंग सामाजिक प्रतिष्ठान – परळी वैजनाथ चे अध्यक्ष सुप्रसिद्ध पत्रकार श्री आत्मलिंग शेटे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर साहित्यिक, सामाजिक व राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर, संस्थेतील विभागीय व प्रादेशिक पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनासाठी ठाणे विभागीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक – श्री बाळासाहेब तोरसकर, कार्याध्यक्ष – श्री अविनाश ठाकूर, उपाध्यक्षा – सौ. मुग्धा कुंटे, सरचिटणीस – सौ. राधिका बापट, ठाणे शहर पश्चिम विभाग अध्यक्षा – सौ. मीना बर्दापूरकर त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगर विभागाचे अध्यक्ष – श्री नवनाथ ठाकूर, कार्याध्यक्ष – श्री प्रतीक नागोळकर, उपाध्यक्ष – सौ. स्मिता धुमाळ, श्री हरिश्चंद्र दळवी, श्री संदीप पाटील, सरचिटणीस – सौ. उज्वला लुकतुके, व चिटणीस – श्रीमती रतन याडकिकर या सर्वांनी मिळून अतिशय मोलाची जबाबदारी सांभाळली आहे. या सर्वांच्या विशेष योगदान असलेल्या या संमेलनाची चर्चा संपूर्ण साहित्य क्षेत्रातून होत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अनेक प्रस्थापित व नवोदित साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
विशेष सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवली नगरीत या संमेलनाचे आयोजन भव्य स्वरूपात केलेले. ग्रंथ दिंडी – ग्रंथ पूजा – उद्घाटन – उपस्थितांचे स्वागत – मान्यवरांचे मार्गदर्शन – पुरस्कार वितरण – शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कर – प्रितीभोजन – परिसंवाद – काव्यासंमेलान – आभार असा भव्य व भरघोस एक दिवसिय कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. तरी सर्व साहित्य रसिकांनी संमेलनाचा आनंद घ्यावा असे आमंत्रण आयोजक समितीकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!