ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील विध्यार्थी गुणवत्ता सिद्ध करत आहेत माजी मंत्री शिवाजीराव नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च पदावर नियुक्त होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत हि बाब अभिमानास्पद असल्याचे मत माजी मंत्री शिवाजीराव नाईक नाईक यांनी व्यक्त केले.
पुदेवाडी ता. शिराळा येथील संदीप शंकर पवार हे केंद्र सरकारच्या अन्न तंत्रज्ञान सहकार मंत्रालयच्या उपसंचालक पदी नियुक्त झालेबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जात यश मिळवत आहे. कौटुंबिक पाठिंब्याच्या जोरावर आणि स्वकष्टातून भारताची भावी पिढी घडत आहे. अधिकाऱ्यांनी सरकारी सेवेत येताना प्रामाणिक राहून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची कामे करावीत. आपली गुणवत्ता सिद्ध करत कर्तव्याची जपणूक करावी.यावेळी शंकर पवार, अमर पवार, राजेश पाटील, भरत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!