आरोग्य व शिक्षण

सोमटणे टोलनाका बेकायदेशीर – किशोर आवारे यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव

Spread the love

सोमाटणे-येथील टोलनाक्यावरील सततच्या टोलवसुली संदर्भात अनेकदा निवेदने देऊनही येथे टोलवसुली सुरूच असल्याने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सदर टोलनाकाबेकायदेशीररीत्या गेल्या १५ वर्षापासून मावळात आहे. जानेवारी महिन्यापासून स्थानिकांकडून टोलवसुली केली जात असल्याने सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी यासंदर्भात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी सांगितले

वरसोली टोलनाका ते सोमाटणे टोलनाका हे अंतर केवळ २७ किलोमीटर आहे. केंद्रशासनानुसार ३५ किलोमीटर व राज्यशासनानुसार ६५ किलोमीटर अंतर निश्चित केले गेले असल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे.यासंदर्भात उच्च न्यायालयाचे वरिष्ठ कायदेतज्ञ प्रवीण वाटेगांवकर यांच्या सल्ल्यानुसार आयआरबी,केंद्र सरकार, राज्य सरकार, एमएसआरडीसी यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती किशोर आवारे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!