ताज्या घडामोडी
तर हजारो थाळ्या पोस्टातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री कार्यालयाला निषेध म्हणून पाठवून देऊ
या अगोदरचे सरकार असो किंवा वर्तमान सरकार असो कोणीच विद्यार्थ्यांच्या सामर्थ्यनात काम करताना दिसत नाही.1.5 वर्षे झाली स्वाधार शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा नाही.सरकारने विद्यार्थ्यांना साधे जेवणाचे सुद्धा पैसे दिले नाही.आम्ही असं म्हणू शकतो की 1.5 वर्षांपासून विद्यार्थ्यांची जेवणाची थाळी रिकामीच आहे.तर येत्या 15 ऑगस्ट 2022 पर्यंत स्वाधार शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले नाही तर 16 ऑगस्टला याच रिकाम्या हजारो थाळ्या पोस्टातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री कार्यालयाला निषेध म्हणून पाठवून देऊ..!
किरण रमेश कांबळे.
भारतीय विद्यार्थी मोर्चा
प्रदेश महासचिव महाराष्ट्र