रत्नागिरी टिडीएफ शिक्षक मतदार संघात तटस्थ !
कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाच्या येवू घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकी मध्ये रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी तटस्थ राहणार असल्याचे माटे – भोजने सभागृह देवरूख येथे झालेल्या सभेमध्ये जाहिर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सागर पाटील , कार्याध्यक्ष संभाजी देवकते , सचिव रोहित जाधव , उपाध्यक्ष जी. एन. पाटील , गणपत शिर्के , सुशांत कविस्कर , ज्येष्ठ सल्लागार सदाशिव चावरे , आत्माराम मेस्त्री , रामचंद्र महाडिक , सर्व जिल्हा पदाधिकारी , सर्व तालुका अध्यक्ष , सचिव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला सचिव रोहित जाधव यांनी जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष , सचिव व सभासदांची कोकण विभागीय शिक्षक मतदार संघा संदर्भातील भूमिका दलवाई हाय. मिरजोळी येथील सभेच्या अनुषंगाने स्पष्ट केली. उपस्थितांमधून संजय चव्हाण , अरुण शिंदे , एकनाथ पाटील , सुभाष सोकासने ,एकनाथ बुळे ,कुमार गावडे ,मानसिंग कदम , के. डी. पवार , आत्माराम मेस्त्री , रामचंद्र महाडिक ,सचिन मिरगल , सुनिल केसरकर ,सदाशिव चावरे ,गिरीश पाटील , अवि पाटील ,सुशांत कविस्कर , गणपत शिर्के यांसह अनेक सभासदांनी आपले मत व्यक्त केले. कार्याध्यक्ष संभाजी देवकते यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक आमदारापेक्षा संघटना महत्वाची असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित सर्वांची मते ऐकून घेवून अध्यक्ष सागर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सभासदांनी विविध उमेदवारांसंदर्भात व्यक्त केलेली भूमिका लक्षात घेवून रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत तटस्थ भूमिका घेत असल्याचे जाहिर केले.
शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणारा आमदार हवा !
राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न तात्काळ सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाचे धोरण अनुदानित शाळा व शिक्षकां विरोधात आहे. केवळ आश्वासन देवून चालणार नाही. निवडणूकीच्या वेळी शिक्षकांची आठवण काढणारा नव्हे तर शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणारा आमदार हवा. जिल्ह्यातील टिडीएफ च्या कार्यकर्त्यांना या निवडणूकी मध्ये आपल्या मना प्रमाणे भूमिका निश्चित करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडून जाईल असा विश्वास रत्नागिरी टिडीएफ चे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केला.