महाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी तळेगावकरांची मदत चिपळूण जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द

Spread the love

तळेगाव : “मदतीचा हात कोकणवासीयांना साथ” या ब्रीद वाक्याने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, तळेगाव दाभाडे व जनसेवा विकास समिती यांनी तळेगावकरांना केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत नागरिकांनी केलेली मदत चिपळूण तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

जीवनावश्यक वस्तू, पाणी, लोणावळा चिक्की, जेवण, उबदार कपडे इत्यादी जवळपास १६ टन सामग्रीचे दोन ट्रक पाठवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीला तत्परतेने धावलेला मावळच्या मावळ्यांनी आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची आपली उदात्त परंपरा कायम ठेवली आहे.

अल्पावधीतच उपलब्ध केलेल्या या मदतीबद्दल जनसेवा विकास समिती आणि संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचे चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!