आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

पीएमआरडीएचे शेतक-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

Spread the love

कार्ला :  कार्ला परीसरातील अनेक शेत जमिनीवर पी एम आर डी ए कडुन आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे कार्ला परीसरातील शेतकय्रांनमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.पी एम आर डी ए ने टाकलेले आरक्षण रद्द व्हावे म्हणून मागील महिन्यात अनेक शेतकय्रांनी पी एम आर डी ए कडे हरकती नोंदविल्या आहे.

कार्ला परीसरातील बहुतांशी शेतकरी अल्पभुधारक आहे. त्यामुळे शेत जमिनीवर पडलेल्या आरक्षणञमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कारण आरक्षण पडल्या मुळे विकासाची सर्व दारे बंद होणार आहे. कुठलीच बॅक कर्ज देऊ शकत नाही. इंद्रायणी काठच्या जमीनीवर पुर नियंत्रण रेषा अधोरेखित केल्याने नदी काठच्या जमीनीही विकासा पासुन वंचित राहणार आहे. या सर्व परीस्थिती मुळे कार्ला परीसरातील शेतकय्रांनवर भविष्यात मोठं सकंट उभं राहणार आहे. हे संकट दुर व्हावे अशी शेतकय्रांची अपेक्षा आहे.

शेतकय्रांना आधार मिळावा म्हणून कृति समित्या स्थापन झाल्या आहेत.स्थापन झालेल्या समित्या शेतकय्रांचे प्रश्न मांडतील अशी दोन्ही समित्या कडुन शेतकय्रांना अपेक्षा आहे.

तालुक्यात नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा झाला. यावेळी कार्ला फाटा येथेही अजित पवार आले होते. यावेळी पी एम आर डी ए टाकलेल्या आरक्षणा संदर्भात उपमुख्यमंत्री काहीतरी बोलतील किंवा दोन्ही समितीचे पदाधिकारी निवेदन देऊन उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील असे शेतकय्रांना अपेक्षित होते. पण असे काहीच न झाल्याने शेतकय्रांची चिंता आणखीनच वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!