इतना सन्नाटा क्यो है भाई ? असा प्रश्न लोणावळा पवनानगर रस्त्यावर विचारला जात होता..!
वाहतूक कोंडी न होता सन्नाटा असल्याचा भास.
इतना सन्नाटा क्यो है भाई ? असा प्रश्न लोणावळा पवनानगर रस्त्यावर विचारला जात होता..!Why is there so much silence, brother? Such a question was being asked on the road of Lonavla Pavananagar..!
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी.३० जुलै.
इतना सन्नाटा क्यो है भाई ,? असा प्रश्न लोणावळा पवनानगर रस्त्यावर विचारला जात होता..! कारण आज रविवार असूनही वाहनांची जास्त वर्दळ नसल्याने शोले मधील तो ए.के. हंगल यांनी साथीदारांना विचारलेला प्रश्न येथील रस्त्याने जा ये करणा-या वाहनचालकांना पडत होता.
शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी लोणावळा शहरातील पर्यटनस्थळे हाऊसफूल होत आसताना वाहनांची होणारी कोंडी यावर लोणावळ्याचे उपविभागीय पोलिसआधिकारी कार्यालयाचे सहाय्यक पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कार्ला लेणी व श्रीएकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या , भाजेलेणी व नवीन शिवशाही धबधब्यावर जाणाऱ्या वाहनचालकांना पवनानगर कडे देवले औंढेखुर्द मार्ग व मळवली , कार्लाफाटा , औंढेखुर्द , दुधिवरेखिंड , लोहगड , विसापूर किल्ले येथे नेमलेला चोख पोलिस बंदोबस्त , होमगार्ड व स्वयंसेवक यामुळे वाहतूक कोंडी न होता सन्नाटा असल्याचा भास झाला.