श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसाला अपूर्व महत्त्व, त्याचा लाभ घेता आला ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा..
तीर्थ क्षेत्र आळंदी येथे श्रावण मास निमित्ताने पहिल्याच दिवशी प्रसाद ( भोजन ) देण्याची संधी मिळाली आमचे भाग्य..
श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसाला अपूर्व महत्त्व, त्याचा लाभ घेता आला ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा..The first day of the month of Shravan has an extraordinary significance, it is the grace of Saint Dnyaneshwar Mauli that we can take advantage of it.
आवाज न्यूज : आळंदी प्रतिनिधी, १८ ऑगष्ट.
तीर्थ क्षेत्र आळंदी येथे श्रावण मास निमित्ताने पहिल्याच दिवशी प्रसाद ( भोजन )देण्यात आला.या वेळी संपूर्ण पवार परिवार आणि मित्र मंडळी उपस्थित होती तसेच गेली अनेक वर्षे “संत ज्ञानेश्वर माऊली महाराज” अन्नदान मंडळ कार्य करत आहे येथे देवस्थान ट्रस्टच्या व संयोजकांच्या वतीने सर्वांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच भरतशेठ तरस, मा सरपंच दत्तात्रय बुचूडे,उद्योजक पप्पुशेठ तापकीर, पोलिस पाटील, राहुलशेठ साकोरे पा, सावरदरी म्हाळुंगे सोसायटी संचालक श्रीहरी सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते कुंडलिकराव बुचूडे,बाबाजी नाना बोत्रे, उत्तममामा शेटे, तुकाराम बोत्रे, गणपतराव साकोरे, नानासाहेब शेटे संतोष शेटे, महेश खलाटे, निलेशशेठ कड, काळुराम आरगडे बाबुराव शेटे, संदिप गुप्ता, शिवाजी बोत्रे,शंकर पवार, भगवंत शिंदे, रोहीदास पवार, दत्तात्रय काकडे, बाळासाहेब पवार, आप्पा शेटे, बाळासाहेब साकोरे, सुधिर धोंडगे, संतोष पवार,सुनिल पवार,साहिल बुचूडे,आणि सर्व परिवार आणि नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होता.
सर्व भोजन प्रसाद व्यवस्थेचे नियोजन खेड तालुका मनसे अध्यक्ष मा उपसरपंच स्मार्ट व्हिलेज सावरदरी संदिप बाळासाहेब पवार व आळंदी शहर अध्यक्ष अजय तापकीर परिवाराच्या वतीने करण्यात आले. तर आळंदी संस्थान ने सर्व प्रकारचे सहाय्य केले. आज चे पुण्य पर्व म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या या दिवसाला अपूर्व महत्त्व आहे त्याचा लाभ घेता आला ही संत ज्ञानेश्वर माऊली यांची कृपा असे उद्गार संयोजकांनी केले व देवस्थान ट्रस्टच्या संयोजकांनी संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे आभार मानले.