आपला जिल्हा

इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित

पाण्याच्या पुर्नवापरामुळे नदीवरील अवंलबित्व कमी होण्यास होणार मदत

Spread the love
पिंपरी, दि. २ मार्च २०२४ : इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे  प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित करण्यात आला आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषण पातळीबाबत नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डायरेक्टरेटने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये नदीच्या प्रदूषण पातळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील औद्योगिक कारखाने, गोदामे आणि अनधिकृत व्यवसायांमधून रासायनिक पाणी, तेल व ग्रीसचे होणारे विसर्जन यातून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुदळवाडी जाधववाडी येथील नाल्यालगतचे अतिक्रमण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मोकळे करण्यात आले.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
चौकट – प्रक्रिया केलेल्या पाण्याचा होतोय पुर्नवापर.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी व्यावसायिक, नागरिक, बांधकाम व्यावसायिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रोत्साहन देत आहे. यासाठी प्रक्रिया केलेले पाणी पाच मिनिटांत टँकरमध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाण्याचा वापर केल्याने नदीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!