डाँ.श्री .प्रदिप जोशी व पन्हळी ग्रामंस्थ यांच्या सहकार्याने पाणी योजना पुर्ण
खंडाळा प्रतीनिधी
बरेच दिवस रखडलेल्या पन्हळी गावच्या स्वतंत्र नळ पाणी योजनेच्या आज दिनांक ९/१/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता डाँ.श्री .प्रदिप जोशी व श्री . अरुण जोशी यांच्या शुभ हस्ते सोलर प्रवाह चालू करुन करण्यात आले.या शुभ प्रसंगी पन्हळी ग्रामंस्थ महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .पन्हळी गावात स्वतंत्र नळ पाणी योजना सुरू झाल्याने महिला वर्गात आनंद दिसून येत होता .बरेच दिवस रखडलेली पाणी योजना डाँ.प्रदिप जोशी यानी पुढाकार घेऊन ती पुर्ण करुन पन्हळी ग्रामंस्थ यांच्या जवळ सोपवली.या शुभारंभा प्रसंगी पन्हळी गावाच्या वतीने श्री .कृष्णा ठिक यांनी प्रास्तविक केले व गावाच्या वतीने डाँ.प्रदिप जोशी व श्री .अरुण जोशी ,श्री .कृष्णा खापले यांचे गावाच्या वतीने पुष्पगुच्ध देऊन स्वागत व आभार मानले .या शुभ प्रसंगी श्री .विनायक किंजळे ,पोलिस पाटिल महेश महाकाळ , यशवंत ठिक ,लक्षण गोताड , अनिल बैकर ,ऋषीकेश कदम ,चंद्रकांत ठिक , कृष्णा खापले , राजन चौगुले , महिला वर्गातून मनीषा किंजळे ,सुजाता खापले ,धनश्री कदम , वसुधा महाकाळ , वासंती किंजळे , कुसुम खापले, देमाय खापले, भक्ती ठिक ,लतीका खापले अशी लहान थोर मंडळी उपस्थित होती .