ताज्या घडामोडी

सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे – माजी मंत्री शिवाजीराव नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

ज्या विश्वासाने सभासदांनी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना निवडून दिले आहे. त्या विश्वासास पात्र राहून सामान्य माणसाला न्याय देणेसाठी पदाधिकारी यांनी काम केले पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
यावेळी रिळे (ता. शिराळा) येथील सेवा सोसायटीच्या अध्यक्ष पदी संपतराव पाटील, तर उपाध्यक्ष पदी बापू पाटील यांची निवड झालेबद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सत्कार केला .तर शिराळा नगरसेवक उत्तम (बंडा )डांगे, उपसरपंच बाजीराव सफकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती .
नाईक पुढे म्हणाले,
रिळे येथील कार्यकर्तानी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रगतीसाठी केलेले काम उल्लेखनिय असलेने सभासदांनी या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास प्यानेलच्या सर्व उमेदवारावर विश्वास दाखवला आहे.नुतन पदाधिकारी यांनी सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून गावातील सर्व घटकांना न्याय देणेचे काम केले पाहिजे. विरोधकांनी जाणून बुजून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका विरोधकांची नसल्यामुळे सभासदांनी त्यांचा एक ही उमेदवार निवडून दिला नाही. निवडून आलेल्या उमेदवारांनी आपल्यावर सभासदांनी जो विश्वास दाखवून आपल्याला संधी दिली आहे त्याचा उपयोग करून सेवा सोसायटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा देण्यासाठी काम केरणेचे आव्हान नाईक यांनी केले.
या वेळी संचालक अशोक पाटील, खंडेराव पाटील, दिपक खामकर ,विष्णु खोत ,दिपक पाटील, कृष्णदेव पाटील , ,शिवाजी पाटील ,प्रकाश सपकाळ,
हिराबाई मस्के ,सुनंदा पाटील ,चंद्रकांत गुरव, विमल डिसले सर्जेराव आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!