रयत क्रांती संघटना प्रत्येक गावात उभी करणार रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री लालासाहेब पाटील
महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री व आमदार श्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यरत असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून समाजातील निरनिराळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व केंद्र सरकारच्या निरनिराळ्या योजनाची माहिती कार्यकर्त्यांनी घरा घरात पोहोचवावी, सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सामाजिक ताकद देण्याचे काम रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून होत आहे. असे मत रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व नेर्ले गांवचे माजी सरपंच श्री लालासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व युवा नेते सागरभाऊ खोत यांच्या नाविन्यपूर्ण धोरणातुन आगामी काळात सांगली – सातारा – कोल्हापूर जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांचे नियोजित संपर्क अभियान राबविणार आहेत.
रयत क्रांती संघटनेचा विस्तार राज्य भर होत असुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी संघटना वाढीसाठी राज्यभर संपर्क दौरे करित आहेत. वाळवा तालुक्यातील देवर्डे, चिकुर्डे, शिराळा तालुक्यातील काळूंद्रे, खराळे गावातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.