वाटेगाव येथे दोन बिबट्यांचा मेंढी कळपावर भ्याड हल्ला आठ मेंढया ठार तर पाच लहान पिल्ली गंभीर जखमी.
नेर्ले (ता.वाळवा)
सविस्तर असे की वाटेगांव येथील संजीरबारच्या माळावर यादव मळ्यात सुधाकर यादव यांच्या शेतात ,गावातील तानाजी ढेबे व इतर मेंढपाळ्यांचा मेंढ्यांचा कळप गेली आठ दिवस बसविण्यात आला आहे.शनिवारी मेंढपाळांनी मेंढ्याची पिल्ली वाघरी मध्ये ठेवली होती.राहिलेली मेंढ्यांचा कळप चरण्यासाठी घेऊन गेले होते.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसामध्ये दबा धरून बसलेले बिबट्यांनी जोरदार हल्ला केला , सदरच्या हल्ल्यात मोठ्या आठ मेंढया ठार झाल्या तर पाच लहान पिल्ली गंभीरत जखमी झाली आहेत. मेंढ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकूण शेतकरी भास्कर यादव ,सुधाकर यादव यांनी घटना स्थळी धाव घेतली . आपल्या समोरच घटना सुरू आहे हे पाहून शेतकरी यादव यांनी आरडा – ओरड केल्याने बिबट्यानी घटनास्थळाहून धूम ठोकली.तानाजी ढेंबे यांचे अंदाजे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी आणि ग्रामस्थ त्रसत झाले आहेत.वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वाटेगांव पंचक्रुशीतून होत आहे.