मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने भव्य वक्ता महाराष्ट्राचा २०२२ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मालगुंड : पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य तालुकास्तरीय खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील सर्व जण सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे विषय असतील
१. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा : आव्हाने, संधी आणि उपाययोजना
२. कोरोनावरील उपाय योजना आणि राष्ट्रसंतांची शिकवण
३. व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर! संतांचे पुकार, वांझ झाले : वास्तव चित्र की काल्पनिक तथ्य
या वक्तृत्व स्पर्धेसाठी वक्तृत्व हे मराठी भाषेतच आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशा आशयाचे असावे.
स्पर्धेसाठी सात मिनिटाचा वेळ असेल.
सदर स्पर्धा ही देसाई हायस्कूल माळनाका रत्नागिरी येथे दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०: ०० वाजता सुरू होणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क –
८८८८०३३६२१,
९१७५५२६६६०,
९७६४८८६३३०.