ताज्या घडामोडी

वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजूरांना शॉल वाटप

Spread the love

साखरकारखान्यांचा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे ऊसतोड मजूर.कडाक्याच्या थंडीमधे पहाटे तीन वाजता उठून ऊसतोड करण्यासाठी या मजूरांना ऊसाच्या फडामधे जावं लागतं.शरीराला सहन न होणार्या थंडीमधे पोटाची खळगी भरण्यासाठी या मजूरांना थंडीची तमा न बाळगता काम करावेच लागते.
ऊसतोड मजूरांची हीच अडचण लक्षात घेऊन वारणानगर तेथील सामाजिक कार्यकर्ते आणि बहिरेवाडी गावचे सुपूत्र डॉ.अभिजीत जाधव यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन त्याच पैशांतून वारणा साखरकारखान्याच्या गाडी अड्ड्यामधील ऊसतोड मजूरांना थंडीपासून संरक्षण मिळावं म्हणून शॉल चं वाटप केलं.दरवर्षी समाजोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉ.जाधव आपला वाढदिवस साजरा करीत असतात.हातावरचं पोट भरण्यासाठी आलेल्या या मजूरांची अडचण दूर करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत डॉ.जाधव यांनी व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!