ताज्या घडामोडी

बाल वयापासूनच शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेतल्यास देश बलवान होईल मधुवंती धर्माधिकारी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
बालवयापासून शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कार्याला सुरुवात केल्यास देश बलवान होण्यास मदत होईल व जागतिक महासत्ता होईल असे प्रतिपादन आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी केले. त्या जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे आयोजित शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक मोहन पवार म्हणाले की ज्याप्रमाणे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या पद्धतीने समानतेच्या कायद्याने वागल्यास देशाला समृद्धता येईल.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार, सचिन चौगुले, अध्यक्षा नेत्रा झाडे, शिक्षिका लताराणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बाल सभा घेण्यात आली. विद्यार्थी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लतारांनी पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मोहन पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!