महाराष्ट्र

राज्यातील बैलगाडी शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेणार ; मंत्रिमंडळाचा निर्णय

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात बंदी असतानाही बैलगाडी शर्यत आयोजन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आयोजकांवर दाखल करण्यात आलेले विविध गुन्हे मागे घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंत्रिमंडळाने आज बैलगाडी प्रेमींना याबाबत दिलासा दिला आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. अनेकांनी बंदीला झुगारून बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. त्यामुळे अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.काल अखेर मंत्रिमंडळ बैठकीत आयोजकांवर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे बैलगाडा चालक-मालक व शौकिनांनी स्वागत केले आहे.

बैलगाडी चालकांना मोठा दिलासा 

राज्यभरात बंदी असताना बैलगाडी शर्यती घेतल्यामुळे अनेक बैलगाडी चालक व मालक आयोजकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होते हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती अखेर सरकारने मोठा निर्णय घेत दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया बैलगाडी चालक-मालक यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!