बळीराम पाटील मराठा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित
कोकरुड /वार्ताहर
चरण (ता.शिराळा) गावचे सुपुत्र आणि सुरत-गुजरात येथील यशस्वी उधोजक बळीराम हरी पाटील यांना मराठा महासंघाचे संस्थापक अविनाश पवार यांच्या हस्ते मराठा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ठाणे येथील आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरविण्यात आले.त्यांना मिळालेल्या पुरस्कारां बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.याप्रसंगी कौशल्य विकास महामंडळाचे मिलिंद भोसले , अजय दरेकर,आथिक विकास महामंडळाचे प्रशांत कांबळे, दि नॅशनल को ऑपरेटिव्ह बॅंकेचे एस.ए. पवार यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय मराठा संघाचे जिल्हा सचिव अनिल काकुलाते, प्रदेश उपाध्यक्ष दीपक पालांडे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनघा जाधव ,महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश महापदी, खजिनदार अजित जाधव,ठाणे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विनोद जाधव,ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरूण फणसे, महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्या सुनीता गव्हाणे, दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर ठाणे जिल्हा महिला सचिव तपस्या कश्यप,निलेश म्हसकर आदी उपस्थित होते.