बळवंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्याकडून रेवणसिद्ध मंदिर परिसरात वित्तीय साक्षरता व स्वच्छता अभियान उपक्रम
रयत शिक्षण संस्थेचे, बळवंत कॉलेज विटा येथील कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाने रेवणसिद्ध मंदिर परिसर रेणावी ता. खानापूर येथे आयोजित केलेल्या वित्तीय साक्षरता व स्वच्छता अभियानात बी.कॉम. व बी.कॉम. आय.टी. शाखेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते. सध्या महाशिवरात्रीनिमित्त ग्राम दैवत रेवनसिद्धाची यात्रा सुरू असल्याने या परिसरात छोटे -मोठे व्यापारी, व्यावसायिक, व लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, यानिमित्ताने येथे वित्तीय साक्षरता व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या परिसरात उपस्थित असलेल्या व्यापारी व व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून त्यांना इंटरनेट बँकिंग, कोअर बँकिंग,मोबाईल बँकिंग, गुगल पे, फोन पे, याविषयीची माहिती दिली. वित्तीय साक्षर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्यांना प्रेरित केले. त्याचबरोबर स्वच्छता अभियानात कचरा, प्लास्टिक, पालापाचोळा, मंदिर परिसरात साठलेल्या जेवणाच्या पत्रावळ्या इ. गोळा करून याची योग्य विल्हेवाट लावली. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये उपस्थित असणाऱ्या जनतेला स्वच्छतेचे महत्व सांगितले. ही मोहीम स्वयंस्फूर्तीने राबविण्याचे ठरविल्याचे मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी सांगितले. या उपक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन डॉ. श्रेया पाटील (आय.क्यू.ए. सी. कोऑर्डिनेटर आणि कॉमर्स विभाग प्रमुख) व प्रा. राणी चव्हाण यांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापिका दिव्या टीकोळे, रंजना बागल, स्नेहल कुंभार, सुधा कांबळे, हिना पानवाले, डॉ. साधू कोकरे, प्रा. विकास गायकवाड यांनी प्रयत्न केले.