राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष भामटा सलिम सय्यद यांच्यावर कासेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा व फसवणूकचा गुन्हा दाखल
इस्लामपूरः प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील इस्लामपुर येथील राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष भामटा सलिम सय्यद यांच्यावर कासेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा व फसवणूकचा गुन्हा दाखल करण्यात आला, हा गुन्हा एकट्यावर दाखल न करता इस्लामपुर येथील राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ प्रमुख पध्दाधिकारी व घोटाळा करणर्याना मदत करण्यात आलेल्या कामगार अधिकार्यांना यामध्ये सहआरोपी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव,स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केली.
जाधव पुढे म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटने नुकताच कामगार कल्याण मंडळाचा कामगार अनुदान घोटाळा बाहेर काढला.मढ्यावरचा लोणी खाण्याचा प्रकार ताबंवे या गावात घडला होता.नवरा मेला असतानाच विधावा महिला लक्ष्मी महादेव निप्रिळ या महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर २लाख २० हजार पैकी निम्मे पैसे १ लाख १० हजार जमा केल्याचे निदर्शनास आले होते, याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यानी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे दिली होती. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ प्रमुख याने पैसे घेतले होते. ताबंवे,नेर्ले,वाटेगाव,सुरूल,ओझर्डे, कासेगाव,रेठरे धरण,मरळनाथपुर,पेठ साखराळे,या गावासह हजारो गोरगरिबां बहुजन कामगार कल्याण मंडळाकडचन खोटी कागदपत्रे सादर करून राष्ट्रीय कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना बोगस कागदपत्रे दाखल करुन बोगस अनुदान घरबांधणीसाठी अडीच लाख,विधवा अनुदान ३४ हजार रुपये, शैक्षणिक अनुदान६० हजार रुपये, कामगार प्रसूतीसाठी १५ हजार अनुदान, गंभीर आजारापणसाठी१ लाख ते ५लाख रुपये विधुरसाठी २४हजार अनुदान, नैसर्गिक मृत्यू साठी दोन लाख अनुदान अपंगत्व आल्यावर वारसांना पाच लाख अनुदान,विवाह साठी तीस हजार अनुदान तर अत्यंविधीसाठी दहा हजार अनुदान कामगार कल्याण मार्फत दिली.रक्कम जमा होण्याची माहिती या कथाकथीत मंडळाला मिळाली जाते. सदर रक्कम हि नोदणी कामगारच्या खात्यात जमा केली जाते,राष्ट्रीय बहुजन कामगार संघटने प्रदेशाध्यक्ष व त्याच्या कामगार पध्दधिकारीनी हजोरो रूपयांची जमीनी, अलिशान गाड्या कामगारांच्या अनुदान पन्नास टक्के रक्कमेवर संपत्ती कमकवली आहे,यामध्ये सदोष असणारे कामगार कल्याण अधिकारी, याच्याही चौकशी करून कारवाई करण्यात यावी.ज्या बाधकाम कामगारची पन्नास रक्कम घेतली आहे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार करावी ती रक्कम परत करुन देऊ.
खातेदारांच्या आधी मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रक्कमचे माहिती कामगार कल्याण कामगार रक्कम जमा झाली कि पदाधिकारी लगेच कामगारांच्या मागे लागुन वरती अधिकारना वरती द्यावी लागते अशी फतवा काढून लागणारी रक्कम ५०% रक्कम तात्काळ करून घेण्याचे प्रकार घेत आहेत.