विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणाबरोबरच कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम माहिती करून स्वतःला सिध्द करणे गरजेचे ; कौस्तुभ गावडे
इस्लामपूर दि 27 (वार्ताहर )विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगल्या गुणासह उत्तीर्ण होण्याबरोबरच बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम माहिती करून स्वतःला सिध्द करत पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले.
ते तुकाराम सावळा कदम विद्यामंदिर मसुचीवाडी येथे एस.एस.सी. विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरणसमारंभात बोलत होते.
अध्यक्षस्थानी पै.विष्णू नागराळे हायस्कूल नागराळे चे मुख्याध्यापक डी. टी. जाधव होते.
यावेळी बोलताना कौस्तुभ गावडे म्हणाले डॉ.बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवली म्हणून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना स्वताच्या गावात शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.विद्यार्थ्यांनी नेहमी मोठे ध्येय ठेवावे व ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. आपल्या समोर नेहमी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज , महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ.बापूजी साळुंखे यांच्या सारख्या महान युग पुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डी. टी. जाधव म्हणाले ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठया प्रमाणावर सुरू होत आहेत त्यामुळे अनुदानित शाळातील विद्यार्थी संख्या कमी होत आहे व त्यामुळे भविष्यात शिक्षक संख्या ही कमी होणार आहे.त्यामुळे बहुजनांच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागण्याचा धोका आहे म्हणून पालकांनी आपली मुले अनुदानित शाळेतच घालावीत.
यावेळी दहावी वर्ग शिक्षक बी.आर.संकपाळ, विद्यार्थी वेदांत फाटक,आदिती कदम,जगदीश पाटील,दिव्या पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी 10 वी विद्यार्थ्यांकडून 3 व जगदीश पाटील यांनी एक असे 4 वॉल फॅन शाळेला भेट दिले.कार्यक्रमास, विवेकानं शिक्षण संस्थेचे माजी व्यवस्थापक मंडळ सदस्य अविनाश कदम,सरपंच राधिका पाटोळे, जनार्दन कदम, बी.पी.कदम, शंकर कदम,सुहास कदम,निवास देशमुख,विकास कदम,उज्वला फाटक यांचे सह शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक संघ सदस्या उपस्थित होत्या.मुख्याध्यापिका एस.ए.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .सौ.एस.आर.कदम यांनी सूत्रसंचालन केले.यु.बी.जाधव यांनी आभार मानले .