शेतकरी संवाद रथयात्रेचे शहरात उत्साहात स्वागत
मुरुम, ता. उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा या उद्देशाने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात या हेतूने जिल्हाभर शेतकरी संवाद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने शहरात रविवारी ( ता. ५) रोजी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शेतकरी संवाद रथयात्रेचे आगमन होताच स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अजित चौधरी, आनंद कांबळे यांनी रथयात्रेस शुभेच्छा दिल्या. जिल्हा संघटक धनराज बिराजदार, जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण रथयात्रा जिल्हाभर राबवत असल्याची रूपरेषा व रथयात्रेचा उद्येश, ध्येय मांडले. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी तरुणांचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न, समस्या व उपाय याबाबत संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळात जिल्हाभर उपक्रम राबवित असल्याची माहिती देवून मनोगत व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायात आले. रथयात्रेसोबत आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना शिवचरित्र ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, जिल्हा संघटक धनराज बिराजदार, उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, तालुका सचिव लक्ष्मण पवार, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल पाटील, संजय सावंत, शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, मोहन जाधव, अजिंक्य मुरूमकर, किशोर आळंगे, अन्वर भाई, प्रणित गायकवाड, सागर बिराजदार, पृथ्वी चौधरी, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अजित चौधरी, सरकार भिमराज ग्रुपचे आनंद कांबळे, टिपू सुलतान ग्रुपचे बाबा कुरेशी, पत्रकार नाहीरपाशा मासुलदार सह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णासाहेब पवार यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर अजिंक्य मुरूमकर यांनी आभार मानले.