आरोग्य व शिक्षण
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार
पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष बंद असणारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरू करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पुणे येथील विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत कोविड परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते.
या बैठकीला विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गो-हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आठवडे बाजारात परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस घेतली नसल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.