पैश्या पेक्षा धर्म महत्वाचा. प.पु.मु.श्री.पियुषचंद्र विजयजी महाराज..
पैश्या पेक्षा धर्म महत्वाचा.
प.पु.मु.श्री.पियुषचंद्र विजयजी महाराज.Religion is more important than money.P.P.M.Shri.Piyushchandra Vijayji Maharaj.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ जुलै.
परमपथ अध्यात्मिक चातुर्मास २०२३ – श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर,तळेगाव दाभाडे येथे प्रवचन चालू आहे. पैशापेक्षा धर्म महत्त्वाचा असे उद्गार चातुर्मासानिमित्त विराजित प.पु.मु.श्री पियुषचंद्र विजय जी महाराज साहेब यांनी काढले.अपेक्षा ठेवली की निराशा मिळते त्यामुळे अपेक्षा न ठेवता कष्ट करणे व काम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले की आपली अपेक्षापूर्ती होते स्वतःला बदलण्याचा मार्ग संयम जीवनामधून जातो यासाठी प्रत्येकाने धर्माला महत्त्व द्यावे व आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन आपले जीवन सार्थक करावे असे महत्त्वपूर्ण आवाहन गुरु महाराज यांनी केले.
स्वस्तिक हे चार गतीचे नाश करण्यासाठी शुभ मानले जाते म्हणून आपण प्रत्येक शुभप्रसंगी सर्वप्रथम स्वस्तिक काढत असतो.रोज सकाळी साडेआठ ते साडेनऊ चातुर्मासा निमित्त प्रवचन श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. अशी माहिती अशी माहिती जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त यांनी आवाज न्यूजला दिली.